.

महाराष्ट्रातील किल्ले - काळदुर्ग किल्ला | Kaldurg fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Kaldurg Killyachi mahiti

 

Kaldurg fort

किल्ल्याची उंची:- 1500 फूट
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांग:- पालघर
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत.  शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना एका दिवसात आरामात पहाता येतात. 

 हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.  जंगल खूप असल्याने येथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.  सर्व परिसर आजही मागासलेल्या अवस्थेत आहे.


 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-  खरे पाहिले तर काळदुर्गला गड  म्हणणे योग्य नाही.  गड असल्याची कोणतीही खूण यावर नाही.  हे एक टेहळणीचे  स्थान असावे असे वाटते.  

गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा होय.  या कातळामुळे हा गड लांब असूनही नजरेत येतो.  गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे. 

 त्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे.  गडावर एक  कुंड देखील आढळते.  किल्ला दोन स्तरात विभागला आहे एक गडमाथा  आणि खालचे पठार.  

पठारावरून  गडमाथ्यावर  जाण्यास दोन ते तीन पायऱ्या आहेत.  पठारावर पाण्याचे एक टाके आहे किल्ल्यावरून संपूर्ण घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.

 गडावर जाण्याच्या वाटा:-
१.  वाघोबा खिंड:- मुंबईहून विरार मार्गे पालघर गाठावे अथवा कल्याण वरून एस ती ने  पालघर ला जावे. पालघर वरून  मनोरे ला जाणारी बस पकडावी. वाघोबा  नावाच्या देवालयाचा थांब्यावर उतरावे.  येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते .  

देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. हातपंप हि खून लक्षात ठेवणे. हातपंपाच्या समोरून वर जाणारी वाट पकडावी.  ही वाट पुढे तीन भागात विभागली जाते डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी. सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येते.


राहण्याची सोय:-  गडावर निवारा असा नाही.
जेवणाची सोय:-  खाण्याची सोय आपणच करावी पिण्याचे पाणी गडावर आहे.
पाण्याची सोय:-  बारमाही  पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:-  वाघोबा खिंडीतून दोन तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी:- सर्व ऋतुत जाता येते.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post