.

महाराष्ट्रातील किल्ले - कोहोजगड किल्ला | Kohojgad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Kohojgad Killyachi mahiti

Kohojgad fort

 किल्ल्याची उंची:- ३२०० फूट

किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांग:- पालघर
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो.  या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.  यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा कोहोज हा प्रमुख किल्ला.  वाड्यापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटरवर वसलेला हा किल्ला बराच जुना आहे.

इतिहास:- या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.  गडावरच्या  खोदीव टाक्यांवरून हा गड बर्‍यापैकी जुना असावा असे वाटते पण यास पुरावा नाही.  सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातचा राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरुज चढवले.  पुढे पेशव्यांनी अठराव्या शतकात काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-  माची वरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता  आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.  माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे.  त्याच्या समोरच दोन टाकी आहेत पण ती खराब झालेली आहेत.  

मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे.  दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.

मंदिराच्या उजवीकडे काही उध्वस्त अवशेष आढळतात. काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे.  मंदिराच्या डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर जाणारी वाट दिसते.  

इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची तीन प्रशस्त टाकी लागतात.  यापैकी एक बुजलेले असून बाकी शेवाळयुक्त  असले तरी पिण्यायोग्य आहे.  इथेच कोपर्‍यात मारुतीची उघडी मूर्ती आहे.  इथून तीच वाट घेऊन पुढे निघाले की आपण पडक्या बुरुज जवळ येतो.  

डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे.  पायर्यांनी वर गडमाथ्यावर जायचं इतकीच सुमारे पंधरा मिनिटात आटोपते.  माथ्यावर वाऱ्याने तयार झालेले दोन सुळके आहेत यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती.  

हीच वरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट.  विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.  इथून पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे.  

खालचा वाडा रस्ता छान दिसतो या सगळ्यात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर प्रस्तरांवर इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवली आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा:-

राहण्याची सोय:-  गडावर निवारा असा नाही शंकराच्या मंदिरात केवळ दोन माणसे राहू शकतात.

जेवणाची सोय:- खाण्याची सोय आपणच करावी पिण्याचे पाणी गडावर आहे.

पाण्याची सोय:-  बारमाही पाण्याची सोय आहे

जाण्यासाठी लागणारा वेळ:-  दोन तास.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post